पथनाट्यातून जनजागृती.
पिंपळे गुरव (हिंदवी न्यूज) : पिंपळे गुरव येथील दिलासा संस्था, मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या सेवाभावी संस्थांच्या वतीने येथील राजमाता जिजाऊ उद्यानात जागतिक जलदिन साजरा करण्यात आला. यावेळी पथनाटया द्वारे पाणी वाचवा, पाणी म्हणजे श्वास ,जगण्याचा विश्वास , पाणी जपून वापरा असा संदेश देउन जनजागृती करण्यात आली. पथनाट्यात भारतरत्न सरदार वल्लभ भाई पटेल प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज पाटील, मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थेचे अध्यक्ष आण्णा जोगदंड, पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समितीचे अध्यक्ष प्रकाश घोरपडे, सौ,वैशाली चौधरी,दिलासा संस्थेचे नंदकुमार कांबळे सहभागी झाले होते.
या प्रसंगी दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी ” पाणी हे सर्व जीवसृष्टीसाठी पृथ्वीवरील अमृत आहे. जगाची लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. त्यामुळे पाण्याची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. यासाठी सर्वांनी ‘ पाणी जपून वापरले पाहिजे., असे मार्गदर्शन केले. भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज पाटील म्हणाले “जागतिक जलदिनाच्या दिवशी पथनाट्य या माध्यमातून “पाणी” ही गंभीर समस्या बनत चालली आहे याचा सर्वांनी गांभीर्याने विचार करावा म्हणून प्रबोधन केले आहे.”
आण्णा जोगदंड यावेळी म्हणाले.. “जगातील ३/४ भाग खाऱ्या पाण्याच्या समुद्राने व्यापला आहे. १/ ४ भागात जमीन आणि गोडे पाणी आहे. या पाण्याचा विनियोग जगातील सर्व माणसांनी जपून करावा. पाणी म्हणजे श्वास ,जगण्याचा विश्वास ,पाणी हे निसर्गाचे अनमोल रत्न आहे ,पाणी हेच जीवन आहे, असे समजून पाणी बचत ही काळाची गरज असे जोगदंड म्हणाले.
पथनाट्य सादरीकरणानंतर कवयित्री राधाबाई वाघमारे आणि योगिता कोठेकर यांनी पाणी बचत या विषयावर कविता सादर केल्या.
आण्णा जोगदंड यांनी उपस्थित नागरिकांना पाणी बचतीची शपथ दिली. याप्रसंगी शिवाजीराव शिर्के, तानाजी एकोंडे, श्रीकांत चौगुले, वृक्षमित्र अरुण पवार,पांडुरंग सुतार, बाळासाहेब साळुंके,विकास कोरे, सूर्यकांत कुरुलकर, पिंपळे गुरव परिसरातील उदय ववले,पवन रंधे कल्पना भेलके, राहुल माने, बाळासाहेब देवकर, पवन रंधे, राहुल जाधव, शुभम बेंद्रे,सागर नागुलकर, सुवर्णा कांबळे, विवेक जाविर,काशिनाथ जोशी, शिवाजी कळसे,ऋषिकेश भोई, राहुल चव्हाण, शांतीसागर पाटील,मारुती कांबळे उपस्थित होते. पाणी बचतीची सामूहिक प्रतिज्ञा आणि राष्ट्रगीत म्हणून पथनाट्याची सांगता झाली.
