Author: Hindavinewsnetwork@gmail.com
रुग्णांच्या नातेवाईकांशीही साधला संवाद; महापालिका रुग्णालयात दाखल रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार पिंपरी, (हिंदवी न्यूज)- फुगेवाडी येथील विषारी दारू सेवन केलेल्या रुग्णांना महापालिकेच्या पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी वायसीएम रुग्णालयाला भेट दिली. दाखल रुग्णांवर आवश्यक सर्व वैद्यकीय उपचार मोफत उपलब्ध करून दिले जात असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांना दिलासा देखील आयुक्तांनी दिला. यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. उज्ज्वला अंदूरकर, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ.…
सुमारे ७ हजार ८९४ जणांनी घेतला लाभ पिंपरी, (हिंदवी न्यूज)- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि वेळेची बचत करणारी सेवा देण्यासाठी दि. १ मे २०२६ पासून महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत प्रवेशासाठी ‘स्वागतम ई-प्रवेश’ ही ऑनलाइन नोंदणी प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून १ मे २०२६ ते २५ मे २०२६ (सायंकाळी ४ वाजेपर्यंत) या कालावधीत सुमारे ७ हजार ८९४ नागरिकांनी या प्रणालीचा लाभ घेतला आहे. स्वागतम ई-प्रवेश प्रणालीअंतर्गत नागरिकांना महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळ www.pcmcindia.gov.in वर जाऊन ‘मुख्य इमारत प्रवेश प्रणाली’ या लिंकद्वारे आपली नोंदणी करणे सहज शक्य होत आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश…
माहिती संकलन आणि नोंदींच्या अचूकतेसाठी दक्षता घेण्याचे निर्देश पिंपरी, (हिंदवी न्यूज)- जनगणना ही अत्यंत महत्त्वाची आणि कालमर्यादित प्रक्रिया असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा, टाळाटाळ किंवा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. ही प्रक्रिया अचूक, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण होण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे. जनगणनेदरम्यान माहिती संकलन, नोंदींची अचूकता आणि प्रशासकीय कामकाजामध्ये दक्षता बाळगावी. या कामामध्ये दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करा, असे निर्देश आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले. जनगणना २०२७ अंतर्गत सुरू असलेल्या गृहसूची व गृहनिर्माण जनगणना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन पिंपरी…
पिंपरी,(हिंदवी न्यूज)– पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पदपथावरील अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. पदपथ हे नागरिकांना चालण्यासाठी असतात, त्यामुळे कोणत्याही पदपथावर अतिक्रमण करणाऱ्यांविरूद्ध महापालिकेच्या वतीने कठोर कारवाई केली जाईल. तसेच काही दुकानदार आपल्या दुकानापुढे अतिक्रमण करून साहित्य ठेवतात. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होऊन नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने अशा दुकानधारकांनी येत्या १५ दिवसांत असे अतिक्रमण कायमस्वरूपी हटवावे, अन्यथा महापालिकेच्या वतीने कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला. महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी क्षेत्रीय कार्यालयनिहाय अतिक्रमण कारवाईच्या कामकाजाचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस…
पिंपरी, (हिंदवी न्यूज )- ‘कविवर्य नारायण सुर्वे यांच्या नावाचा जीवनगौरव सन्मान मिळाल्याने मी कृतार्थ झालो आहे. राळेगणसिद्धी हे गाव आदर्शगाव होण्यासाठी टाटा मोटर्सचे निवृत्त महाव्यवस्थापक मनोहर पारळकर यांचे फार मोठे योगदान आहे!’ अशी कृतज्ञतेची भावना ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांनी आदर्शगाव राळेगणसिद्धी येथे शनिवार, दिनांक २३ मे २०२६ रोजी व्यक्त केली. पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने अण्णा हजारे यांना टाटा मोटर्सचे सेवानिवृत्त महाव्यवस्थापक मनोहर पारळकर यांच्या हस्ते पद्मश्री नारायण सुर्वे जीवनगौरव सन्मान प्रदान करून गौरविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते इंद्रजीत पाटोळे (पद्मश्री नारायण सुर्वे भला माणूस पुरस्कार), राष्ट्रपती पोलीस…
पिंपरी, (हिंदवी न्यूज)- चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या ‘इ- चलन’ कारवाईतून वाहतूकदारांना मुक्तता मिळावी, यासाठी शासन दरबारी अनेकदा पाठपुरावा केला आहे. यापूर्वी मुंबई, आझाद मैदान येथे आणि पुण्यामध्ये आरटीओ कार्यालयावर वाहन चालकांनी आंदोलन केले आहे. तरी देखील या मुद्द्यावर तोडगा निघाला नाही, ‘इ-चलन’ कारवाई चुकीची आहे. शासनाने बस मालकांना या त्रासापासून मुक्त करावे, अन्यथा पुन्हा राज्यात बस ओनर्स असोसिएशनच्या वतीने आंदोलनाच्या भडका उडेल ,असा इशारा पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रय भेगडे यांनी दिला. शुक्रवारी, (दि.२२ मे) पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा पिंपरी येथे झाली. यावेळी पिंपरी चिंचवड आरटीओचे पवन नवादे, महाराष्ट्र महासंघाचे अध्यक्ष प्रकाश गवळी, बोकी…
फुले, गांधी, नेहरू विचारमंच आयोजित “महात्मा गांधी आणि राष्ट्रवाद” व्याख्यानाचे प्रथम पुष्प पिंपरी, (हिंदवी न्यूज) – सर्वधर्मसमभाव हीच भारताची ओळख आणि हाच खरा राष्ट्रवाद आहे. १८८५ मध्ये जात, धर्म, भाषा, वर्ण, रंग, वंश हे सर्व सोडून हिंदू, पारशी, ख्रिश्चन, मुसलमान, शीख समाजातील नागरिक एकत्र येऊन त्यांनी काँग्रेसची स्थापना केली. हीच भारत राष्ट्र उभारणीची सुरुवात होय. भारतात एकत्वाची भावना निर्माण करून त्याचे नेतृत्व करण्याचे काम महात्मा गांधीजींनी केले. दलित समाजाला आत्मसन्मान मिळवून देण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. गांधी आणि आंबेडकरांमध्ये मतभेद होते, परंतु देशासाठी ते एकत्र होते. त्याचे फलित म्हणजे भारतीय राज्यघटना आहे, असे मत ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत विजय तांबे…
पिंपरी, (हिंदवी न्यूज)- जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यातील ‘घरयादी आणि गृहगणना’ प्रक्रिया सध्या सुरू असून, स्व-गणना (Self Enumeration) पूर्ण केलेल्या नागरिकांनी त्यांना प्राप्त झालेला एसई आयडी (SE ID) संबंधित गणनाकारांना द्यावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. दि. १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत नियुक्त गणनाकार नागरिकांच्या घरी भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान स्व-गणनेत सादर केलेल्या माहितीची पडताळणी, पुष्टीकरण आणि अंतिम सादरीकरणाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्यासाठी नागरिकांनी त्यांचा एसई आयडी गणनाकारांना उपलब्ध करून देणे बंधनकारक राहणार आहे. गणनाकारांकडून माहितीची पडताळणी आणि मान्यता झाल्यानंतरच ‘घर-यादी आणि गृहगणना’ प्रक्रिया पूर्ण मानली जाणार आहे. स्व-गणना…
सर्व विभागांना परस्पर समन्वयातून नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याच्या सूचना पिंपरी, (हिंदवी न्यूज) – आषाढीवारी पालखी सोहळ्यानिमित्त महापालिकेच्या वतीने वारकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सेवा सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही याची सर्व संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी. वारकऱ्यांचा मुक्काम, विसावा तसेच पालखी मार्गावरील ठिकाणी सर्व यंत्रणांनी आवश्यक सोयीसुविधांचे प्रभावी नियोजन करावे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही तडजोड न करता पोलीस प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवून नियोजनबद्ध पद्धतीने कामकाज करावे, असे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याचे आगमन येत्या काही दिवसांत पिंपरी चिंचवड शहरात होणार आहे. या पार्श्वभूमीवर जगद्गुरु संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी…
महापालिका प्रशासनाचा निष्काळजीपणा; खासदार श्रीरंग बारणे यांचा आरोप पिंपरी,(हिंदवी न्यूज)-औंध-रावेत बीआरटी. रोडवरील रक्षक चौकातील उड्डाणपुलावर उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी अपघात झाला. तीव्र उतारामुळे चालकाचे नियंत्रण सुटून मोटार पलटी झाली. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याला महापालिका प्रशासनाचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप खासदार श्रीरंग बारणे यांनी केला आहे. या पुलाची खासदार श्रीरंग बारणे यांनी पाहणी केली होती. महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली नव्हती. तीव्र उतारामुळे भविष्यात अपघात होतील, अशी भीती व्यक्त केली होती. परंतु प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. शुक्रवारी पुलाचे उद्घाटन झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी अपघात झाला. भविष्यात मोठा अपघात…